Wednesday, 20 February 2019

नाटक राजगति ने बदलला राजनीतीला पाहण्याचा माझा दृष्टीकोन...

नाटक राजगति ने बदलला राजनीतीला पाहण्याचा माझा दृष्टीकोन...



सुरुवात करेन अगदी अभ्यासक्रमा पासून – शालेय जीवनात political science हा माझा न आवडणारा विषय कारण त्याचे गांभीर्य, त्याचे महत्व आणि त्या विषयाचा अर्थ माझ्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही.. पोहोचले ते फक्त घोकंपट्टीतले शब्द , प्रश्नांची उत्तरं आणि मार्क्स. म्हणजेच परीक्षेत पास होण्यापुरता तो विषय “विषय” वाटायचा.. परंतु हा विषय आयुष्याची जडण-घडण करणारा आहे याची जाणीव एका नाटकामुळे झाली.


“राजगति” – वैश्विक रंगचिंतक आणि तत्वज्ञ मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित "राजगति" नाटकाने माझा राजनीती कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. सुरुवातीला मी हि common man म्हणजेच सामान्य माणसा सारखा विचार करत होते. राजनीती मध्ये आपल्याला पडायचे नाही, राजकारण माझा विषय नाही, हा वाईट मार्ग आहे इत्यादी... पण कधी हा विचार आपण करतो का, स्वतःचे जीवन जगण्याचा निर्णय, मार्ग, पद्धत आपण नकळत एका unknown व्यक्ती ला देतो आणि एका ठराविक कालावधीसाठी (म्हणजेच 5 वर्ष) तो जे म्हणेल तेच ऐकतो , तेच करतो..? हो, म्हणायला तर आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत राहतो पण त्याची अंमलबजावणी होत आहे का ? जेव्हा राजनीती आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा अविभाज्य भाग आहे तर आपण सामान्य माणूस म्हणून त्या पासून अलिप्त का राहतो ?



राजनीती हा केवळ शब्द नाहीये... अनेक मानसिकता दर्शवणारी आणि त्यांना शुद्ध , सात्विकतेच्या मार्गावर आणणारी एक पवित्र नीती आहे, म्हणूनच त्याला राज-नीती म्हंटले जाते. अनेक मानसिकता, अनेक विचार, स्वभाव, रंग,भाषा या सगळ्यांना माणुसकी या तत्वाशी जोडणारी आहे राजनीती. खरं पाहता, प्रत्येक माणसामधली प्राणउर्जा आहे 'राजनीती'. हो, हा प्रश्न येणं साहजिक आहे कि एवढ्या पवित्र नीती ला वाईट का म्हंटलं जातं ? मुळात राजनीती वाईट नाहीच. राजनीती मध्ये असणारी माणसं, माणसांचे चरित्र ठरवतं कि मार्ग वाईट आहे कि चांगला. माणसांच्या आत दोन प्रवृत्त्या असतात – आत्मबळ आणि आत्महीनता. आत्मबळ स्वतःला रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करते आणि आत्महीन प्रवृत्ती रचनात्मकतेला नष्ट करून न्यूनगंड निर्माण करते ज्यात माणूस स्वतःचाच विध्वंस करतो. ह्या दोन्ही प्रवृत्त्या प्रत्येक माणसात असतात, प्रश्न हा आहे कि कोणती प्रवृत्ती कशावर हावी होते. आत्मबळाने समृद्ध असलेला माणूस समाजाला घडवतो आणि नवीन सकारात्मक दिशा देतो, आणि हेच आत्महीनतेने ग्रासीत असलेला स्वतःसोबत समाजाला ही नकारात्मकतेने संक्रमित (infected) करतो.



राजगति या नाटकाने प्रत्येक माणसाच्या आत असणाऱ्या आत्महीन प्रवृत्ती चे निदान करून त्याला आत्मबळ प्रदान केले. म्हणजेच या नाटकामुळे हि जाणीव नक्कीच झाली कि एक उत्तम समाज घडण्याकरिता, सर्वप्रथम विचारांना महत्व देणाऱ्या माणसांची सक्त आवश्यकता आहे. राजगति या नाटकाच्या माध्यमातून मी स्वतःतल्या कलाकाराला आणि व्यक्तीला नवीन दिशा देऊ शकले. म्हणजेच यातून मला भगत सिंग समजला, महात्मा गांधी कळले, आंबेडकरांचे समाजाप्रती योगदान कळले आणि कार्ल मार्क्स ला जाणून घेतले. Performance मधून त्यांचे विचार मार्गदर्शन स्वरूपात स्वतः आणि प्रेक्षक पर्यंत पोहोचवता आले. नाटकाच्या संहितेतून आणि दृश्य रचनेतून हा विचार नक्कीच पेटतो कि हे व्यक्तिमत्व सामान्य असूनही असामान्य कार्य करून गेले, आपला देश आपल्याला परत मिळवून देण्यासाठी प्रत्येकाची भूमिका होती, आता आपली भूमिका आणि जबाबदारी उचलण्याची वेळ आहे, त्या क्रांतीवीरांचे तत्व , त्यांचे विचार आपल्यात कुठे आहेत त्याची जाणीव होणे महत्वाचे आहे. 



राजगति नाटकात प्रत्येक विचारधारेचा सन्मान केला आहे, या नाटकात कुठल्याच पक्षाची , रंगाची , व्यक्तीची बाजू न घेता राजनीती ला समग्ररित्या पाहण्याचा कलात्मक दृष्टीकोन दिला आहे. या नाटकाने राजनीती मधील मुख्य चार बिंदूना रेखांकित केले आहे – सत्ता , व्यवस्था , चरित्र आणि राजनीती. आपण म्हणतो राजनीती वाईट आहे, परंतु राजनीतीच्या मार्गावर राजनीतिक चरित्र घडवणं गरजेचे आहे. प्रत्येक वेळी निवडणूक झाल्यावर सत्ता एकातून दुसर्याच्या हातात जाते पण व्यवस्था मात्र बदलतच नाही, आणि समाज तसाच गुरफटला जातो. इथेच राजनैतिक चरित्र घडवण्याचे काम नाटक “राजगति” करते. आपल्या स्वातंत्र काळात या क्रांतिवीरांनी लढा देऊन इतिहास रचला , आता वर्तमानात देशाची व्यवस्था आपण हाती घेऊन एक उज्वल भविष्य रचण्याची वेळ आहे. आताची गुलामी ही थेट विचारांवर प्रहार करणारी आहे, विचारांना नष्ट करणारी आहे आणि हा एक प्रकारचा विकारच आहे. आताच्या जनसामान्यांना या विकाराला तोंड देण्यासाठी रचनात्मक विचार निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्यातले विकार संपवून विचारांची निर्मिती आणि चेतना जागृत करणारे नाटक "राजगति" प्रत्येकाने नक्की पहावे आणि अनुभवावे. 




कोमल खामकर 
थिएटर ऑफ रेलेवन्स अभ्यासक आणि रंगकर्मी

Saturday, 16 February 2019

बंदो में हैं दम.. वन्दे मातरम्...

बंदो में हैं दम.. वन्दे मातरम्... 

अनजान थे हम.. एक दुसरेसे भी और खुद से भी.. क्या ताकत है हममें , जानकर भी उसे पहचान न पाए.. हम विभिन्न होकर भी एकजुट हैं और यही हमारी ताकत है.. हमारे विचारों में परिवर्तन से ही भारत हर गुलामी से उन्मुक्त होता आया है और होता रहेगा... हाँ हम युवा क्रांतिकारी हैं !!



आज भारत के सामने कईं प्रश्न हैं, उनमें से महत्वपूर्ण प्रश्न है - "हम कौन हैं ?".. क्या हम लिंग हैं - महिला , पुरुष , लड़का , लड़की... क्या हम धर्म हैं - हिन्दू , मुस्लिम , सिख , ईसाई , बहुजन.. क्या हम वर्ग हैं - ब्राह्मण , क्षत्रिय, वैश्य, शुद्र... क्या हम पद हैं - डॉक्टर, राजनेता, शिक्षक, मजदुर, सिपाही... या अपने अन्दर झांके और पूछे - क्या हम इंसान हैं ? - इंसान , इंसानियत....

बाजारवाद ने इंसानियत को खत्म करने का नया और प्रभावशाली हथियार चुना है खरीदो और बेचो, जो मनुष्य में बसी संवेदनाएं, भावनाएं और विचारों को खरीद कर उन्हें एक चलते फिरते शरिर तक में सिमित कर देता है, जिसके कारण मनुष्य अपने होने को नकार कर जीवन जीने से अलिप्त रहता है.. इस दौर में जहाँ बाजारवाद दिन भर दिन बढ़ता जा रहा है , जहाँ खुशियाँ खरीदी जाती है और विचार एवं तत्त्व बेचे जाते हैं वहां इंसानियत का टिकना मुश्किल होता है ! जैसे पेड़ से पत्तो का गिरना उन्हें मुरझा देता है , वैसेही मानवता के तत्त्व की जड़ से हम अलग हो जाये तो जीवन का मुरझा जाना निश्चित है...

हमारे देश को युवाओं के चैतन्यता की आवश्यकता है, जिसके लिए युवाओं का सकारात्मक एवं रचनात्मक तरीके से वैचारिक पोषण होना अनिवार्य है.. और इसीलिए थियेटर ऑफ़ रेलेवंस नाट्यप्रक्रिया पहल करती है - नाटक के माध्यम से स्वयं एवं सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, वैचारिक स्तर पर रचनात्मक परिवर्तन.. यह बदलाव की कलात्मक प्रक्रिया है.. 



हमने देखा है संघर्ष गांधी, भगत सिंह, अंबेडकर और कार्ल मार्क्स का , उनके जीवन को जीया है नाटक के माध्यम से नयी दृष्टी के साथ। अपने आपको परिचित किया है अपने भीतर की उन कोषिकाओं से जो इन क्रांतिवीरों में हुआ करती थीं। भारत की संस्कृति है - आत्मखोज और यही संस्कृति हमें भीतर से मजबूत बनाती है और चेतनात्मक व्यक्तित्व का निर्माण करती है..

आज के युवाओं की चुनौतियां क्या है - इंटरनेट , मोबाइल , बाजारवाद , भावनाओं को दिशा , संगत और अब आगे क्या करें ... उद्देश्य हो, ध्येय हो, अपने होने को साबित करने का तरीका स्पष्ट हो तो यह युवा भगत सिंह कहलाते हैं , अपने आप को पहचानना हमें गांधी बनाता है , अपना चिंतन प्रबुद्ध करता है । लेकिन आज गांधी की एहमियत केवल नोटों तक में दिखती है, यह दुर्भाग्य है। 

थियेटर ऑफ़ रेलेवंस अंतर्गत प्रक्रियाओं का हासिल रहा - 

1. युवाओं ने खोजा अभिव्यक्ति का अपना तरीका.. संवाद के माध्यम से जुड़े स्वयं से, अपनी जमीन से, सपनों से और समूह से.

2. स्वयं नियोजन, निर्णय एवं नियोजन का प्रवर्तन.

3. सहभागिता और पहल.

4. अपनी चुनौतियों को नाटक के माध्यम से पहचानना और उनपर स्वयं समाधान खोजना. 

5. चैतन्य अभ्यास द्वारा अपने चिंतन को बढ़ाना..



थियेटर ऑफ़ रेलेवंस के नाटकों की विशेषता है की वे कलाकार को व्यक्तिगत प्रक्रीयाओं से रूबरू कराते हैं. अपने अन्दर झाँकने के लिए प्रेरित करते हैं और अपने अन्दर की सकारात्मक इच्छाशक्ति, कल्पनाशक्ति को बाहर निकाल कर व्यक्ति को उसके गुणों से परिचित कराते हैं.. मुझे अपने साथ साथ अपने समूह को , अपने परिवार को , अपने समाज को और अपने देश को आगे लेकर जाने की जिम्मेदारी निभानी है.. और इसीलिए विशेषकर व्यक्ति सचेतन , शुद्ध और सच्चा होना अनिवार्य है..

सहभागियों के स्वभाव, चिंतन, विचार, संकल्पनाएँ और अनुभव के बारीक़ आयामों पर लक्षपूर्वक मार्गदर्शन किया रंगचिन्तक मंजुल भारद्वाज ने.. हर चुनौती को सुलझाने का अलग तरीका होता है और अलग तरीके की खोज हमें आत्मखोज की तरफ ले जाती है.

कठोर 
14 से 18 अप्रैल 2018
युसूफ मेंहर अली सेंटर , पनवेल 
उत्प्रेरक - वैश्वक रंगचिंतक एवं दार्शनिक मंजुल भारद्वाज

जीवनाला रंगदृष्टी प्रदान करणारा विचारमंच..

जीवनाला रंगदृष्टी प्रदान करणारा विचारमंच..


आदिकाळापासून संवाद प्रक्रियेची शैली म्हणजे –Performing Art... आयुष्यात घडलेल्या घटना अभिनय, नृत्य, संगीत, चित्रकला किंवा विविध कलाकृतींच्या माध्यमातून समूहाला सांगण्यात यायच्या.. म्हणजेच कलेचा मूळ हेतू हा जीवनाचा अर्थ शोधण्यात, समजण्यात आणि संवाद करण्यात होता.. पण जसजसा काळ पुढे सरकला तसतशी कलाही सोयीनुसार साचेबद्ध होत गेली... कलेचा मूळ हेतू - “संवाद” हरवला, आणि उरले निव्वळ प्रदर्शन.. अश्या या खरेदी विक्रीच्या काळात कलेचे सत्व टिकवणे अत्यंत आव्हानात्मक आणि आवश्यक आहे आणि म्हणूनच रंगमाचाला “विचारमंचा” चे स्वरूप देऊन 12 ऑगस्ट 1992 रोजी रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी कलेचे मूळ उद्देश्य लक्षात ठेऊन “थिएटर ऑफ रेलेवंस” रंगसिद्धांताला जन्म दिला.

“थिएटर ऑफ रेलेवंस” एक असे रंगचिंतन आहे ज्याने थिएटरच्या माध्यमातून जीवनातले रेलेवन्स शोधले, आणि प्रेक्षकांमध्ये वैचारिक मंथनाला सुरुवात केली... ज्याने थिएटरला साचेबद्ध चौकटीतून उन्मुक्त केले आणि समाजात परिवर्तन आणण्याचे सशक्त मध्यम बनवले.. "थिएटर ऑफ रेलेवंस"हे केवळ नाट्यतत्वा पर्यंत मर्यादित  नसून जीवनाला कलात्मक दृष्टी देणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेने नाटकाला मनोरंजनाच्या चौकटीच्या बाहेर, परिवर्तनाचे एक सशक्त माध्यम म्हणून पाहिले आहे.. आणि हे परिवर्तन आधी स्वतःत, परिवारात आणि मग समाजात केले, ज्यामुळे प्रत्येक जनसामान्याला "परिवर्तन" आपली गरज वाटू लागली.. जिथे परिवर्तन हा केवळ शब्द न राहता एक सशक्त अनुभव, सकारात्मक दृष्टिकोन आणि ठोस पुरावा आहे ज्याला प्रत्येकजण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, अनुभवू शकतो, त्याला मोजू शकतो.. 

परिवर्तन तेव्हाच घडतं जेव्हा प्रस्थापित प्रवाहाच्या विरोधात वाटचाल करण्याची दृष्टी आणि जिद्द असते..आणि ही दृष्टी अपल्याला सत्वाची अनुभूती देते.. असेच सातत्याने रचनात्मक दृष्टी निर्माण करणारे "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे रंगचिंतक आणि रंगअभ्यासक जिद्दीने, स्थापित प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहून आपल्या कलात्मक आणि वैचारिक ऊर्जेने स्वतःचे अस्तित्व घडवण्याच्या प्रक्रियेत आहेत.. आणि आपल्यातल्या सत्वाचा एक कलात्मक सोहळा म्हणून सातत्याने "थिएटर ऑफ रेलेवन्स  उन्मुक्ततेचे 25 वर्ष" च्या निमित्ताने "तीन दिवसीय कलात्मक नाट्यमहोत्सव" आयोजित करत आहेत..

"काळाला" धरून रहाणारी "कला" म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यप्रक्रिया..या नाट्यमहोत्सवाचे उद्देश्यच आहे - संवाद, आजच्या काळाशी.. नाटकाची पहिली भूमिका आहे संवाद साधणे, हा संवाद प्रेक्षाकांना आणि कलाकारांना एकमेकांबद्दल व एकमेकांसाठी विचार करण्यास प्रेरित करतो.. परंतु आता रंगभूमीची चौकट आखल्यामुळे कलाकार स्टेज पर्यंत मर्यादित राहतात आणि प्रेक्षक टाळ्या वाजवण्यापर्यंत.. इथे थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रिया प्रेक्षक आणि कलाकारांमधली दरी भरून काढते आणि प्रेक्षक हा सर्वप्रथम आणि सशक्त रंगकर्मी आहे हा विश्वास निर्माण करते जेणेकरून प्रेक्षक नाटकाच्या प्रस्तुति नंतर रंगमंचावर येऊन संवाद साधतात आणि आपली भूमिका व दृष्टी स्पष्ट करतात... 

या नाट्यमहोत्सवात 3 कलात्मक आणि क्लासिक नाटकांची प्रस्तुति होते - "गर्भ" , "अनहद नाद - Unheard Sounds of Universe" आणि "न्याय के भंवर में भंवरी" ज्यांची संकल्पना निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी केले आहे. या तिन्ही नाटकांमधील, कलाकार कुठल्याही ठराविक भूमिकांमध्ये न राहता स्वतःच्या अभिनय कौशल्याने विचारांचे सौंदर्य प्रस्तुत करतात.. बबली रावत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर आणि तुषार म्हस्के सातत्याने कलेची साधना करत, काळाला एक नवीन वैचारिक दृष्टिकोन देण्याकरिता प्रतिबद्ध आहेत. प्रत्येक कलाकार आपल्या नाटकातल्या तत्वांना व्यवहारीकतेत आणतो आणि त्याचे प्रमाण प्रेक्षकांनी देऊन सत्व निर्माण होते, हे या प्रक्रियेचे वैशिष्ठ्य आहे. 



"गर्भ" नाटकाने माणसातल्या माणूसकीचा संदेश दिला आहे.. जसं आपण आईच्या गर्भातून बाहेर पडून शारीरिक जन्म घेतो तसंच आपण समाजाने विणलेल्या गर्भातून बाहेर पडून आपले अस्तित्व घडवतो आणि वैचारिक जन्म घेतो.. स्पर्श आणि स्पंदन या दोन तत्वांनी माणूस जन्माला येतो, आणि कालांतराने ही तत्व शुष्क होत जातात आणि उरतं फक्त हाडामांसाचं शरीर, जे जड होऊन समाजासाठी आणि स्वतःसाठी घातक ठरतं. प्रकृतीचा नियमच आहे की 9 महिने 9 दिवसाच्या कालावधी नंतर बाळाला गर्भाच्या बाहेर येणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक माणसाने  माणूसकीला बंदीस्त करणारे कोष तोडून वेळेत बाहेर पडणे अनिवार्य आहे नाहीतर समाज आणि व्यक्ती दोघांचा अंत निश्चित! या कोषांना तोडण्याचा संघर्ष आणि या संघर्षातून निर्माण होणारी आशा म्हणजे नाटक "गर्भ"..



"अनहाद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने कलाकारांना त्यांच्यातील सात्विकतेची आणि कलात्मक शक्तीची ओळख करून दिली..कला आणि कलाकार हे प्रॉडक्ट नाही आणि कला म्हणजे मजुरी करणे नव्हे...या नाटकाने कलाकारांचा अंर्तध्वनी सशक्त करून त्यांना उन्मुक्त केले आहे आणि प्रत्येक कलाकाराला त्यांच्या स्वतंत्र सकारात्मक विचारांचे मालक बनवले आहे. अंर्तनाद ऐकण्याची प्रक्रिया सुरू होते सजग असण्या पासून आणि सजग असण्याचे लक्षण म्हणजेच सजीव असणे.. 



"न्याय के भंवर में भंवरी" या नाटकात स्त्री आणि पुरुषाच्या समानतेवर भाष्य केले आहे.. समानता, एका न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणासाठीचा केलेला वैचारिक लढा.. पितृसत्तेवर वैचारिक प्रहार.... या व्यवस्थेत पितृसत्ता कशी रुजली आणि समाजावर त्याचा होणारा परिणाम, याचे निदान करणारी एक कलात्मक प्रस्तुती... 

या तिन्ही नाटकांची प्रस्तुति दिल्ली , मुंबई , पनवेल मध्ये संपन्न झाल्यानंतर आता ठाणे गडकरी रंगायतन मध्ये 27, 28, 29 मार्च 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहेत. 



27 मार्च या वैश्विक रंगमंच दिवशी, थिएटर ऑफ रेलेवन्स कलात्मक नाट्य महोत्सवाचा शुभारंभ होत आहे.. हा एक स्थानिक पासून जागतिक स्तराशी जोडणारा प्रयोग आहे की ज्यात संवादाच्या माध्यमातून जनमानसात एका वैचारिक प्रक्रियेची सुरुवात होईल आणि प्रत्येक जीवन हे किती कलात्मक आणि मानवीय आहे ही दृष्टी प्रदान करेल..एक कलात्मक पाऊल वैचारिक चळवळीसाठी... 

थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी आणि अभ्यासक

कोमल खामकर