नाटक राजगति ने बदलला राजनीतीला पाहण्याचा माझा दृष्टीकोन...
सुरुवात करेन अगदी अभ्यासक्रमा पासून – शालेय जीवनात political science हा माझा न आवडणारा विषय कारण त्याचे गांभीर्य, त्याचे महत्व आणि त्या विषयाचा अर्थ माझ्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही.. पोहोचले ते फक्त घोकंपट्टीतले शब्द , प्रश्नांची उत्तरं आणि मार्क्स. म्हणजेच परीक्षेत पास होण्यापुरता तो विषय “विषय” वाटायचा.. परंतु हा विषय आयुष्याची जडण-घडण करणारा आहे याची जाणीव एका नाटकामुळे झाली.
“राजगति” – वैश्विक रंगचिंतक आणि तत्वज्ञ मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित "राजगति" नाटकाने माझा राजनीती कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. सुरुवातीला मी हि common man म्हणजेच सामान्य माणसा सारखा विचार करत होते. राजनीती मध्ये आपल्याला पडायचे नाही, राजकारण माझा विषय नाही, हा वाईट मार्ग आहे इत्यादी... पण कधी हा विचार आपण करतो का, स्वतःचे जीवन जगण्याचा निर्णय, मार्ग, पद्धत आपण नकळत एका unknown व्यक्ती ला देतो आणि एका ठराविक कालावधीसाठी (म्हणजेच 5 वर्ष) तो जे म्हणेल तेच ऐकतो , तेच करतो..? हो, म्हणायला तर आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत राहतो पण त्याची अंमलबजावणी होत आहे का ? जेव्हा राजनीती आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा अविभाज्य भाग आहे तर आपण सामान्य माणूस म्हणून त्या पासून अलिप्त का राहतो ?
राजनीती हा केवळ शब्द नाहीये... अनेक मानसिकता दर्शवणारी आणि त्यांना शुद्ध , सात्विकतेच्या मार्गावर आणणारी एक पवित्र नीती आहे, म्हणूनच त्याला राज-नीती म्हंटले जाते. अनेक मानसिकता, अनेक विचार, स्वभाव, रंग,भाषा या सगळ्यांना माणुसकी या तत्वाशी जोडणारी आहे राजनीती. खरं पाहता, प्रत्येक माणसामधली प्राणउर्जा आहे 'राजनीती'. हो, हा प्रश्न येणं साहजिक आहे कि एवढ्या पवित्र नीती ला वाईट का म्हंटलं जातं ? मुळात राजनीती वाईट नाहीच. राजनीती मध्ये असणारी माणसं, माणसांचे चरित्र ठरवतं कि मार्ग वाईट आहे कि चांगला. माणसांच्या आत दोन प्रवृत्त्या असतात – आत्मबळ आणि आत्महीनता. आत्मबळ स्वतःला रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करते आणि आत्महीन प्रवृत्ती रचनात्मकतेला नष्ट करून न्यूनगंड निर्माण करते ज्यात माणूस स्वतःचाच विध्वंस करतो. ह्या दोन्ही प्रवृत्त्या प्रत्येक माणसात असतात, प्रश्न हा आहे कि कोणती प्रवृत्ती कशावर हावी होते. आत्मबळाने समृद्ध असलेला माणूस समाजाला घडवतो आणि नवीन सकारात्मक दिशा देतो, आणि हेच आत्महीनतेने ग्रासीत असलेला स्वतःसोबत समाजाला ही नकारात्मकतेने संक्रमित (infected) करतो.
राजगति या नाटकाने प्रत्येक माणसाच्या आत असणाऱ्या आत्महीन प्रवृत्ती चे निदान करून त्याला आत्मबळ प्रदान केले. म्हणजेच या नाटकामुळे हि जाणीव नक्कीच झाली कि एक उत्तम समाज घडण्याकरिता, सर्वप्रथम विचारांना महत्व देणाऱ्या माणसांची सक्त आवश्यकता आहे. राजगति या नाटकाच्या माध्यमातून मी स्वतःतल्या कलाकाराला आणि व्यक्तीला नवीन दिशा देऊ शकले. म्हणजेच यातून मला भगत सिंग समजला, महात्मा गांधी कळले, आंबेडकरांचे समाजाप्रती योगदान कळले आणि कार्ल मार्क्स ला जाणून घेतले. Performance मधून त्यांचे विचार मार्गदर्शन स्वरूपात स्वतः आणि प्रेक्षक पर्यंत पोहोचवता आले. नाटकाच्या संहितेतून आणि दृश्य रचनेतून हा विचार नक्कीच पेटतो कि हे व्यक्तिमत्व सामान्य असूनही असामान्य कार्य करून गेले, आपला देश आपल्याला परत मिळवून देण्यासाठी प्रत्येकाची भूमिका होती, आता आपली भूमिका आणि जबाबदारी उचलण्याची वेळ आहे, त्या क्रांतीवीरांचे तत्व , त्यांचे विचार आपल्यात कुठे आहेत त्याची जाणीव होणे महत्वाचे आहे.
राजगति नाटकात प्रत्येक विचारधारेचा सन्मान केला आहे, या नाटकात कुठल्याच पक्षाची , रंगाची , व्यक्तीची बाजू न घेता राजनीती ला समग्ररित्या पाहण्याचा कलात्मक दृष्टीकोन दिला आहे. या नाटकाने राजनीती मधील मुख्य चार बिंदूना रेखांकित केले आहे – सत्ता , व्यवस्था , चरित्र आणि राजनीती. आपण म्हणतो राजनीती वाईट आहे, परंतु राजनीतीच्या मार्गावर राजनीतिक चरित्र घडवणं गरजेचे आहे. प्रत्येक वेळी निवडणूक झाल्यावर सत्ता एकातून दुसर्याच्या हातात जाते पण व्यवस्था मात्र बदलतच नाही, आणि समाज तसाच गुरफटला जातो. इथेच राजनैतिक चरित्र घडवण्याचे काम नाटक “राजगति” करते. आपल्या स्वातंत्र काळात या क्रांतिवीरांनी लढा देऊन इतिहास रचला , आता वर्तमानात देशाची व्यवस्था आपण हाती घेऊन एक उज्वल भविष्य रचण्याची वेळ आहे. आताची गुलामी ही थेट विचारांवर प्रहार करणारी आहे, विचारांना नष्ट करणारी आहे आणि हा एक प्रकारचा विकारच आहे. आताच्या जनसामान्यांना या विकाराला तोंड देण्यासाठी रचनात्मक विचार निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्यातले विकार संपवून विचारांची निर्मिती आणि चेतना जागृत करणारे नाटक "राजगति" प्रत्येकाने नक्की पहावे आणि अनुभवावे.
कोमल खामकर
थिएटर ऑफ रेलेवन्स अभ्यासक आणि रंगकर्मी
सुरुवात करेन अगदी अभ्यासक्रमा पासून – शालेय जीवनात political science हा माझा न आवडणारा विषय कारण त्याचे गांभीर्य, त्याचे महत्व आणि त्या विषयाचा अर्थ माझ्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही.. पोहोचले ते फक्त घोकंपट्टीतले शब्द , प्रश्नांची उत्तरं आणि मार्क्स. म्हणजेच परीक्षेत पास होण्यापुरता तो विषय “विषय” वाटायचा.. परंतु हा विषय आयुष्याची जडण-घडण करणारा आहे याची जाणीव एका नाटकामुळे झाली.
राजनीती हा केवळ शब्द नाहीये... अनेक मानसिकता दर्शवणारी आणि त्यांना शुद्ध , सात्विकतेच्या मार्गावर आणणारी एक पवित्र नीती आहे, म्हणूनच त्याला राज-नीती म्हंटले जाते. अनेक मानसिकता, अनेक विचार, स्वभाव, रंग,भाषा या सगळ्यांना माणुसकी या तत्वाशी जोडणारी आहे राजनीती. खरं पाहता, प्रत्येक माणसामधली प्राणउर्जा आहे 'राजनीती'. हो, हा प्रश्न येणं साहजिक आहे कि एवढ्या पवित्र नीती ला वाईट का म्हंटलं जातं ? मुळात राजनीती वाईट नाहीच. राजनीती मध्ये असणारी माणसं, माणसांचे चरित्र ठरवतं कि मार्ग वाईट आहे कि चांगला. माणसांच्या आत दोन प्रवृत्त्या असतात – आत्मबळ आणि आत्महीनता. आत्मबळ स्वतःला रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करते आणि आत्महीन प्रवृत्ती रचनात्मकतेला नष्ट करून न्यूनगंड निर्माण करते ज्यात माणूस स्वतःचाच विध्वंस करतो. ह्या दोन्ही प्रवृत्त्या प्रत्येक माणसात असतात, प्रश्न हा आहे कि कोणती प्रवृत्ती कशावर हावी होते. आत्मबळाने समृद्ध असलेला माणूस समाजाला घडवतो आणि नवीन सकारात्मक दिशा देतो, आणि हेच आत्महीनतेने ग्रासीत असलेला स्वतःसोबत समाजाला ही नकारात्मकतेने संक्रमित (infected) करतो.
राजगति या नाटकाने प्रत्येक माणसाच्या आत असणाऱ्या आत्महीन प्रवृत्ती चे निदान करून त्याला आत्मबळ प्रदान केले. म्हणजेच या नाटकामुळे हि जाणीव नक्कीच झाली कि एक उत्तम समाज घडण्याकरिता, सर्वप्रथम विचारांना महत्व देणाऱ्या माणसांची सक्त आवश्यकता आहे. राजगति या नाटकाच्या माध्यमातून मी स्वतःतल्या कलाकाराला आणि व्यक्तीला नवीन दिशा देऊ शकले. म्हणजेच यातून मला भगत सिंग समजला, महात्मा गांधी कळले, आंबेडकरांचे समाजाप्रती योगदान कळले आणि कार्ल मार्क्स ला जाणून घेतले. Performance मधून त्यांचे विचार मार्गदर्शन स्वरूपात स्वतः आणि प्रेक्षक पर्यंत पोहोचवता आले. नाटकाच्या संहितेतून आणि दृश्य रचनेतून हा विचार नक्कीच पेटतो कि हे व्यक्तिमत्व सामान्य असूनही असामान्य कार्य करून गेले, आपला देश आपल्याला परत मिळवून देण्यासाठी प्रत्येकाची भूमिका होती, आता आपली भूमिका आणि जबाबदारी उचलण्याची वेळ आहे, त्या क्रांतीवीरांचे तत्व , त्यांचे विचार आपल्यात कुठे आहेत त्याची जाणीव होणे महत्वाचे आहे.
राजगति नाटकात प्रत्येक विचारधारेचा सन्मान केला आहे, या नाटकात कुठल्याच पक्षाची , रंगाची , व्यक्तीची बाजू न घेता राजनीती ला समग्ररित्या पाहण्याचा कलात्मक दृष्टीकोन दिला आहे. या नाटकाने राजनीती मधील मुख्य चार बिंदूना रेखांकित केले आहे – सत्ता , व्यवस्था , चरित्र आणि राजनीती. आपण म्हणतो राजनीती वाईट आहे, परंतु राजनीतीच्या मार्गावर राजनीतिक चरित्र घडवणं गरजेचे आहे. प्रत्येक वेळी निवडणूक झाल्यावर सत्ता एकातून दुसर्याच्या हातात जाते पण व्यवस्था मात्र बदलतच नाही, आणि समाज तसाच गुरफटला जातो. इथेच राजनैतिक चरित्र घडवण्याचे काम नाटक “राजगति” करते. आपल्या स्वातंत्र काळात या क्रांतिवीरांनी लढा देऊन इतिहास रचला , आता वर्तमानात देशाची व्यवस्था आपण हाती घेऊन एक उज्वल भविष्य रचण्याची वेळ आहे. आताची गुलामी ही थेट विचारांवर प्रहार करणारी आहे, विचारांना नष्ट करणारी आहे आणि हा एक प्रकारचा विकारच आहे. आताच्या जनसामान्यांना या विकाराला तोंड देण्यासाठी रचनात्मक विचार निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्यातले विकार संपवून विचारांची निर्मिती आणि चेतना जागृत करणारे नाटक "राजगति" प्रत्येकाने नक्की पहावे आणि अनुभवावे.
कोमल खामकर
थिएटर ऑफ रेलेवन्स अभ्यासक आणि रंगकर्मी










